100 टक्के अनुदानावर जमीन मिळत आहे; काय आहे योजना पहा!

Free Land Scheme: महाराष्ट्रातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून सरकारला आपली शेतजमीन विकण्यासाठी तसेच इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी नमूद केलेल्या विविध माहिती अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केलेले आहेत. ही योजना नेमकी काय आहे? याचा लाभ कसा मिळू शकतो? अशी सर्व माहिती आपण पाहुयात

सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील भूमी शेतकरी, भूमी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत. तसेच त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने योजना सुरू केलेली आहे तसेच यामुळे त्यांच्या मजुरीवर असणारे अवलंबित व कमी व्हावेत. या उद्देशाने ही ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना’ 2004 पासून राज्यभरत राबविण्यात येत आहे.

सध्या जमिनीच्या दरात झालेली मोठी वाट पाहता, या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभा राज्यभरातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देण्यात करिता जिरायत जमिनीसाठी प्रति एकर रुपये 5 लाख तर बागायती जमिनीसाठी प्रति एकर 8 लाख रुपये इतक् कमाल मर्यादेपर्यंत खरेदी करण्यासाठी 14 ऑगस्ट 2018 मध्ये सामाजिक आणि न्याय विषय सहाय्य विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला. त्यामध्ये सविस्तर माहिती नमूद केलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध असणारी जमीन ही लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान तत्वावर आणि चार एकर कोरडवाहू ( जिरायती जमीन) जमीन किंवा दोन एकर ओली ता खालील म्हणजेच (बागायती जमीन) उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून जर जमीन खरेदी करायची असेल किंवा जमीन कसायची असेल तर ही जमीन योग्य असणे. देखील गरजेचे आहे अशाच जमिनीचा समावेश करण्यात आलेला आहे. जमीन ही डोंगर उत्तराची खडका नदी पात्राच्या जवळ किंवा क्षारयुक्त नसावीत.

अर्ज कुठे करावा?

विकण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी जमीन मालकांनी नमूद नमुन्य मधील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय भवन नासरडी पूल, नाशिक कार्यालयामध्ये कागदपत्रे जमा करावीत.

Leave a Comment