Ration Card E KYC Maharashtra 2025: रेशन कार्डधारकांनो, आता ‘या ग्राहकांना’ रेशन मिळणार नाही!

Ration Card E KYC Maharashtra 2025: राज्यभरातील आर्थिक दुर्बल घटक तसेच गरजू आणि गरीब कुटुंबासाठी रेशन कार्ड ( Ration Card E KYC Maharashtra 2025) हे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची साधने आणि मान्यता येत आहे. केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे ( PDS) आणि कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, मीठ यांसारखे जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. अशा प्रकारच्या पुरवण्यात येणाऱ्या वस्तूंचा लाभ हा अनेक बोगस ग्राहक घेत असल्याचे समोर आलेले आहे. तसेच याचा लाभ जर बनावट कागदपत्रांचा वापर करून घेण्यात येत असेल तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ई केवायसी (Ration Card E KYC Maharashtra 2025) प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे.

ई केवायसी ( Ration Card E KYC) करण्यासाठी अंतिम मुदत

केंद्र सरकारकडून ग्राहकांनाही केवायसी करण्यासाठी अनेक वेळा आवाहन करण्यात आलेले होते. एक केवायसी प्रक्रियेद्वारे रेशन कार्ड धारकांची ओळख निश्चित करण्यात येते ज्यामध्ये आधार क्रमांक जोडून आपले नाव पत्ता कुटुंबातील सदस्यांची संख्या पडताळणी करण्यात येत आहेत. यामुळे मृत किंवा बनवट व्यक्तींच्या नावावरून जे धान्य घेण्यात येत होते. याला आळा घालण्यासाठी याच्या माध्यमातून वापर करण्यात येणार अन्नधान्याचा पुरवठा हा अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास देखील यामुळे मदत होईल.

Ladki Bahin Yojana May Installment: लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

राज्य सरकारने इकेवायसी साठी सुरुवातीला 31 मार्च 2025 अंतिम मुदत दिलेली होती. परंतु त्यानंतर मात्र अनेक नागरिकांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नसल्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा 30 एप्रिल 2025 पर्यंत अंतिम मुदत वाढविण्यात आलेली होती. तरीही बऱ्याच लोकांनी आपली केवायसी पूर्ण केली. नसल्याकारणाने 30 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिलेली होती. इतक्या वेळ शासन निर्णय कडून आणि तारीख वाढवून देखील 77 टक्के लोकांनी आपली ही केवायसी पूर्ण केल्याचे समोर आलेले तर 23 टक्के लोकांनी आपली केवायसी न केल्याचे अजून देखील प्रलंबित आहे.

ई केवायसी Ration Card E KYC) प्रक्रिया पूर्ण न केल्यास काय होईल?

राज्य सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे. की, 30 जून 2025 पर्यंत आपली ई केवायसी (Ration Card E KYC Maharashtra 2025) न केल्यास रेशन कार्ड धारकांना रेशन मधून वगळण्यात येणार आहे. तसेच रेशन देखील मिळणार नाही. अशा कुटुंबांना पुढील महिन्यापासून रेशन देण्यात येणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर गरज कुटुंबाला अन्नधान्याचा सामना कराव लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर आपली ही केवायसी करणे अनिवार्य आहे.

रेशन कार्ड इ केवायसी ( Ration Card E KYC) कशी करायची?

आपली रेशन कार्ड e KYC वर्षी करण्यासाठी पुढील प्रक्रिया

मोबाईलच्या माध्यमातून ( Ration Card E KYC Maharashtra 2025)

  • सर्वात प्रथम आपल्या मोबाईलचे प्ले स्टोअर ॲप ओपन करून ‘Mera E KYC’ हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  • त्यानंतर मोबाईलच्या ओटीपी च्या माध्यमातून आपली इकेवायसी पूर्ण करू शकता.
  • ॲप मध्ये तुम्हाला लॉगिन करताना आपली रेशन कार्ड ची सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे.
  • तुम्ही आपली इ केवायसी केल्यानंतर तुम्हाला मेसेज पाठवण्यात येतो.

जवळच्या सीएससी ( CSC) केंद्र जाऊन ई केवायसी

तुम्हाला जर आपल्यास मोबाईलच्या माध्यमातून ई केवायसी करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत असल्यास तुम्ही आपल्या जवळच्या सीएससी ( CSC) केंद्रात भेट देऊन देखील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

ई केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • रेशन कार्ड धारकांचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • सदस्य जोडायचे किंवा कमी करायचे असल्यास( जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र यासंबंधी कागदपत्रे)
  • नवीन सदस्य जोडणे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

राज्य सरकारने सर्वच स्थानिक प्रशासनांना आपली पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रातील कार्यालयांना प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची एक वेळेसही करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. ‘Mera E KYC’ या ॲपच्या माध्यमातून देखील घरबसल्या इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत आहे. अशा प्रकारची सेवा ही सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर आपली ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. जरी केवायसी पूर्ण केली नाहीत तर रेशनचा लाभ रेशन कार्ड ला वगळण्यात येऊ शकते. आणि अशा प्रकारे जर गरीब कुटुंब किंवा आर्थिक दुर्बल घटक यांनी ई केवायसी केली नाहीत तर त्यांना अन्नाचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर ही केवायसी करणे आवश्यक आहे. 30 जून 2025 पर्यंत आपली केवायसी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे आपली लवकरात लवकर केवायसी करणे आवश्यक आहे.

Leave a Comment